“झेडपी, मनपा निवडणुका महायुती एकत्रित लढणार”, मंत्री शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य

Shambhuraj Desai on Local Body Elections : निवडणूक प्रक्रियेमधला मी एक भाग आहे. महायुतीच्या राज्य समन्वय समितीत दोन मंत्री भाजप आणि दोन मंत्री शिवसेनेचे आहेत. दोन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री मिळून जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) महायुती म्हणून लढवणार असं प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी (Shambhuraj Desai) केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहरात शिंदे गटाच्यावतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर मंत्री देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीत कोणताच विसंवाद नाही, आणि आगामी निवडणुका एकत्रितच लढणार असल्याचे संकेत दिले. यानंतर त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य युतीवर भाष्ट टाळलं.
“जागावाटपात ओढाताण झालीच तर शरद पवारांचा सल्ला घेऊ”, फडणवीसांचा खोचक टोला
देसाई म्हणाले, ठाकरे गट म्हणजेच उबाठा व मनसे यांच्या एकत्र येणार या केवळ चर्चा सुरू आहेत. यामध्ये अधिकृत प्रवक्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे चर्चा झालेले नाही. जोपर्यंत अधिकृत प्रवक्त्यांकडून पक्षाची भूमिका जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळातील माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी भाष्य करणे योग्य नाही असा शंभूराज देसाई म्हणाले. तसेच युतीवर भाष्य करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आम्ही अजिबात गांभीर्याने घेत नाही अशा शब्दांत देसाई यांनी राऊत यांना टोला लगावला.
शिवसेना कुणाची, लोकांनीच सांगितलं
देशात लोकशाही अस्तित्वात आहे. शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचे याचा निर्णय आता झाला आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी देखील मतदान करून निर्णय दिला की खरी शिवसेना कोणाची आहे. निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे मतदारांनीच करून दाखवला असल्याने खरी शिवसेना कोणाची हे लोकांना माहिती आहे असा टोला देखील मंत्री शंभूराजे यांनी ठाकरे गटाला लगावला.
“सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय आता 2029 मध्ये..”, बड्या मंत्र्याचा इशारा कुणाला?